वीर अंगद
अंगद होता उभा पाय पुढे करून
सरदार सर्व उभे होते जरा मागे सरकून
ते पाहून आला रावणाला राग
घाबरून सरदारांनी केला आपल्या अब्रूचा त्याग
एक एक सरदार त्याचा हलवू लागला पाय
अंगदाचा पाय इतक्या लवकर हलेल काय ?
सर्वांनी श्वास रोखला, जेव्हा रावण उठला
अंगदाच्या जवळ जेव्हा येऊन पोचला
रावण खाली वाकल्यावर, अंगद त्याला म्हणाला
मुकाट्याने शरण ये हे सांगायला आलो आहे तुला
अंगदाने झट्कन हात मुकुटापाशी नेला
उचलला रावणाचा मुकुट आणि दूर फेकून दिला
हनुमानाने नंतर तो हवेतच झेलला
अखेर युद्धात रामच जिंकला
No comments:
Post a Comment