Wednesday, August 26, 2009

मी कोण ?

कधी मी असते झाड
कधी होऊन जाते माड
कधी असते सुंदर फूल
कधी होते कानातील डूल
कधी होते मोठ्या लाटा
कधी होते असंख्य वाटा
नंतर कधीतरी लक्षात येते
’मी माणूस आहे’ मी म्हणते...

Sunday, August 23, 2009

कर्ण

जेव्हा सूर्य अस्ताला जायला निघाला
तेव्हा ऋषींच्या वेषात इंद्र कर्णाकडे निघाला
कर्णाकडे होती शक्तिशाली कुंडले
जेव्हा ती मागितली इंद्राने, सर्वांचे तेव्हा बोलणेच खुंटले.


पण कर्ण होता दानशूर स्वभावाचा
पाठवायचा नाही तो कुणाला रिकाम्या हाताचा
सूर्याने त्याला हे सांगितले होते आधी
कर्ण म्हणाला मी असं करत नाही कधी
कर्णाने कवचकुंडले अर्पण केली.
इंद्राची मुद्रा आनंदित झाली.


कर्णाचे जीवन संपले दुसर्‍याच दिवशी
कुंती मात्र रडत होती मूकपणे मनाशी

वीर अंगद

वीर अंगद

अंगद होता उभा पाय पुढे करून
सरदार सर्व उभे होते जरा मागे सरकून
ते पाहून आला रावणाला राग
घाबरून सरदारांनी केला आपल्या अब्रूचा त्याग

एक एक सरदार त्याचा हलवू लागला पाय
अंगदाचा पाय इतक्या लवकर हलेल काय ?
सर्वांनी श्वास रोखला, जेव्हा रावण उठला
अंगदाच्या जवळ जेव्हा येऊन पोचला

रावण खाली वाकल्यावर, अंगद त्याला म्हणाला
मुकाट्याने शरण ये हे सांगायला आलो आहे तुला
अंगदाने झट्कन हात मुकुटापाशी नेला
उचलला रावणाचा मुकुट आणि दूर फेकून दिला

हनुमानाने नंतर तो हवेतच झेलला
अखेर युद्‍धात रामच जिंकला

Friday, August 21, 2009

घर

सारे सारे बाहेर होते
कोणी नव्हते घरात
फ़क्त उभी एक मुलगी घराच्या दारात
ती गाणे गात होती सुरात
पण ते गाणे ऐकायला कोणी नव्हते घरात